Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 2765 articles
Browse latest View live

…तर तुम्हाला दुरूस्तीची गरज आहे!

$
0
0

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ
अगदी यंत्रवत झालंय का तुमचं आयुष्य? घर ते ऑफिस, ऑफिस ते घर... मग थांबा. ज्याप्रमाणे यंत्राला तेलपाण्याची गरज असते तशीच शरीरालाही दुरुस्तीची गरज आहे.
हल्ली आपण इतक्या घाईत असतो की कशाकशाला म्हणून वेळ नसतो. सगळेच एखाद्या मशिनसारखे किंबहुना मशिनच झालो आहोत. सकाळपासून रात्रीपर्यंत घर-काम करत, टार्गेट पूर्ण करण्यामागे लागलेलं मशीन! पण मशिनमध्ये आणि माणसामध्ये मोठा फरक असा आहे, की मशिनला माणसासारखं मन नाही.

मशिनला शारीरिक थकवा आला, तरी आपल्यासारखा मानसिक थकवा, तणाव त्याला जाणवत नाही. तसंच, मशीन खूप काम करून गरम झालं, की ते आपण थोडा वेळ तरी म्हणजे गार होईपर्यंत बंद तरी ठेवतो. मात्र, आपण कितीही थकलो तरी थोडा ब्रेक, विश्रांती घेतो का? मशिनला जसं वेळोवेळी तेलपाणी, दुरूस्ती, इंधनाची गरज भासते, तशीच ती आपल्यालाही असते. आपल्याला दर २-३ तासांनी थोडं-थोडं खाण्याचा सल्ला आपल्या आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिला असेल, तर आपण तो पाळतो का? दिवसातील रोज थोडा वेळ तरी व्यायामासाठी काढतो का? कित्येक जण ऑफिसच्या तणावामुळे एवढे थकलेले असतात, की घरी आल्यावर परत व्यायामासाठी घराबाहेर पडण्याचा विचारच करू शकत नाहीत. आपला स्टॅमिना कमी झाला आहे, अकाली म्हातारपण जाणवायला लागलं आहे हे लक्षात येऊनही त्यासाठी पावलं उचलायची शारीरिक तसंच मानसिक तयारीच होत नाही. आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आला आहे हे कसं ओळखावं; तर खालील गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागते आहे का, हे प्रत्येकाने तपासून बघावं:

रात्रभर झोपूनही सकाळी उत्साह वाटत नाही.

संध्याकाळी घरी आल्यावर काहीही करण्याची इच्छा होत नाही.

अगदी लहानसहान कामंसुद्धा आपल्यासाठी दुसऱ्यांनी करावी असं वाटतं. उदा. पिण्यासाठी पाणी आणून देणं, पंख्याचं बटन लावणं, बेल वाजल्यावर दार उघडणं इ.

संध्याकाळी घरी आल्यावर घरातील कोणाबरोबरही न बोलता शांत, काहीही न करता बसून राहावंसं वाटणं.

छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरी तसंच ऑफिसमध्ये चिडचिड होणं.

दिवसभर ऑफिसमध्ये काम करून, थकूनही रात्री शांत झोप न येणं.

कामाचा अकारण ताण येणं.

मुलांना, घरच्यांना दिवसभराच्या थकव्यामुळे इच्छा असूनही वेळ न देणं.

मुलांबरोबर खेळण्यासाठी, त्यांच्याबरोबर दंगा मस्ती करण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी शारीरिक ताकद न पुरणं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आला दिवस आनंदाने काम करून हसत-खेळत जगण्याऐवजी पुढं रेटणं.

शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे कित्येक गोष्टींना आपल्याला मुकावं लागतं. कित्येक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. हल्ली आयटी इंडस्ट्रीमुळे किंवा एकंदरच औद्योगिकीकरणामुळे कित्येक जणांना भरपूर पगार आहेत. खर्च करण्याची क्षमताही वाढली आहे; पण आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्याचा आनंद घेता येत नसेल, तर आपलं नक्कीच काहीतरी चुकतं आहे. आठवड्यातील एखादा दिवस किंवा दिवसातील थोडा वेळ तरी आपण आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी देऊयात.

रोजच्या दिवसातील थोडा वेळ आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी, व्यायामासाठी देऊयात.

दिवसभरात आपल्या शरीराला आवश्यक आहार आपण घेऊयात आणि रोजचा येणारा दिवस सर्वांबरोबर आनंदात उत्साहात जगूयात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाहेरच्या खाण्याची चटक

$
0
0

डॉ. अविनाश भोंडवे

बटाटेवडा, कांदाभजी, सामोसे, वडापाव, अंडाभुर्जी, भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली, डोसा ही नावं ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. आजच्या बदलत्या जीवनशैलीत असंख्य लोकांसाठी गाड्यांवर मिळणारं असं चटपटीत अन्न हा रोजचा आहार बनला आहे.

रोजच्या रोज कामांच्या मागे धावताना, कमिटमेंट आणि डेड लाइन्स पूर्ण करताना जवळजवळ प्रत्येकाचीच भंबेरी उडते. खाणं-पिणं आणि जेवण यांच्या वेळा पाळणं तर बहुसंख्य लोकांना जड जातं. त्यामुळे कधी भूक लागली, तर गल्लोगल्ली असलेले खाण्याचे स्टॉल्स आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवरील हे चमचमीत खाद्यपदार्थ खुणावतात.

आरोग्याला घातक

रस्त्यावरचं हे चटकदार खाणं जिभेला नक्कीच सुखावते; पण पोटाला अमाप छळतं. या खाद्यांसाठी वापरले जाणारे पदार्थ म्हणजे पीठ, तेल, रंग हे दुय्यम दर्जाचे असू शकतात. बटाटे, पाव, पुरी अशा ज्या तयार गोष्टी वापरल्या जातात, त्यांच्याही स्वच्छतेची आणि ताजेपणाची शक्यता सुतराम नसते. हे पदार्थ उघड्यावर असतात, त्यामुळे रस्त्यावरील धूळ, माती आणि कचरा आणि या सर्वांत असलेले जंतू, विषाणू, जंत यांचा समावेश होऊन तेच आपल्या पोटात जातात. त्यात या ठिकाणी घोंगावणाऱ्या माश्याही असतात. परिणामतः जुलाब, उलट्या, कावीळ, विषमज्वर असे साथीचे आजार त्यातून होतात.

जिभेला लालूच दाखवणारे पदार्थ बनवणाऱ्या लोकांचं स्वतःचं आरोग्य आणि त्यांच्या आरोग्यविषयक सवयी तितक्याच नमुनेदार असतात. अस्वच्छ हात, घामानं आणि धुळीनं माखलेले कपडे, स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात न धुणं, पदार्थ बनवायची आणि साठवायची त्यांची भांडी, पाण्यासाठी वापरायचे कळकट ग्लास, असा सारा आनंदीआनंद असतो. अनेकदा आदल्या दिवशीचे शिल्लक शिळे पदार्थच पुन्हा गरम करून चटकदार बनवून दुसऱ्या दिवशी लोकांना वाढले जातात.

मुंबई शहरात झालेल्या एका पाहणीनुसार रस्त्यावर क्षुधाशांती करणाऱ्यांपैकी ८८ टक्के लोक पोटाच्या आजारानं त्रस्त होतात. दुसऱ्या एका संस्थेनं सुमारे १०० हातगाड्या आणि खाद्यपदार्थांच्या ठेल्यावरील या रुचकर अन्नाचे नमुने घेऊन सादर केलेल्या चाचणी अहवालाप्रमाणे या सर्वांत इ. कोलाय, साल्मोनेला, शिगेला, जियार्डिया, अमिबा, स्टॅफिलोकॉकस, जंत असे जिवाणू सापडले.

हृदयविकाराला कारणीभूत

या फेरीवाल्यांच्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या मिष्टान्नात भजी, सामोसे, वडे अशा तळल्या जाणाऱ्या पदार्थांचं आकर्षण सर्वांत जास्त असतं. याकरता जे तेल सकाळी एकदा काढईत टाकलं जातं, तेच दिवसभर उकळलं जात असतं. त्यातील शिल्लक तेल परत दुसऱ्या दिवशी वापरलं जातं. यामुळे त्या तेलाचे विघटन होऊन सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तयार होतं. याचं सतत सेवन केल्यानं रक्तातील कोलेस्टेरॉल वाढून उच्च रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता असते.

तेल, चीज अशा पदार्थांच्या वापरामुळे यात असलेले भरपूर उष्मांकदेखील वजनवाढीस कारणीभूत ठरतात. २५० ते ५०० कॅलरी असलेली ही खाद्यं हृदयासाठी जास्तच धोकादायक असतात.

'सुरक्षित अन्न- शेतापासून ताटापर्यंत' असं नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक आरोग्य दिनाचं घोषवाक्य होतं. जागतिक आरोग्यसंघटनेच्या आकडेवारीनुसार दूषित अन्नामुळे दरसाल २० लक्ष लोक आपले प्राण गमावतात. ही परिस्थिती सुधारण्यासाठी बाहेरचं अन्न खाणं टाळा, असं लोकांना सांगणं हा आदेश एककल्ली ठरेल; कारण अनेक जण हे पदार्थ नाईलाज म्हणून खातात. या खाद्यविक्रेत्यांच्या स्वच्छतेबाबत, त्यांच्या स्वतःच्या आरोग्याबाबत आणि पदार्थांच्या आरोग्यविषयक निर्मळतेबाबत प्रशासनानंच पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. तसं पाहायला गेलात, तर अन्न आणि औषध प्रशासनाचे, महानगरपालिकांचे यासाठी अनेक लोककल्याणकारी नियम आणि कायदे आहेत. मात्र प्रत्यक्षात हे कायदे बासनात बांधून ठेवले जातात आणि तमाम नागरिक स्वतःच्याच आरोग्याबद्दल उदासीन राहून त्याकडे काणाडोळा करतात.

पिण्याचं स्वच्छ पाणी मिळणं हा जसा जनतेचा हक्क आहे, तसाच बदलत्या आरोग्यशैलीत, हॉटेलात, ढाब्यावर, फूड स्टॉलवर, रस्त्यावरील हातगाडीवर पूर्णपणे खात्रीशीर आणि निरामय खाद्य मिळणं हासुद्धा आवश्यक अधिकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिट आहे बॉस

$
0
0

संकलन - कीर्ती नेरकर

बॉलिवूडचा अमका नट सिक्स पॅक अॅब्जसाठी घाम गाळतोय, तमकी नटी झिरो फिगर बनवतेय असं नेहमी वाचायला मिळतं. आपले मराठी नट-नट्याही असं काही करतात का हो? तर याचं उत्तर 'हो' आहे. मराठी इंडस्ट्रीतले अनेक अभिनेते-अभिनेत्रीही आपला फिटनेस राखून आहेत. योगापासून डाएटपासून बऱ्याच गोष्टी ते कसोशीनं पाळतायत...

बारीक होण्यासाठी मेहनत

माझं असं ठाम मत आहे की शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही माणसानं फिट असायला हवं. अभिनयाच्या क्षेत्रात फिगर मेंटेन करणं हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणूनच मी माझ्या आहारावर आणि बारीक होण्यावर लक्ष केंद्रित केलंय. मला बरीच लोकं विचारतात, की तुला बारीक व्हायची गरजच काय? तशी तू मुळातच बारीक आहेस. खरंतर माझ्या उंचीमुळे लोकांना कळतच नाही की माझं वजन वाढलंय. जर मी तुम्हाला बारीक दिसतेय तर ती मी घेत असलेल्या मेहनतीमुळेच. तब्येतीकडे दुर्लक्ष केलेलं मला बिलकूल आवडत नाही. तब्येत खराब करून बारीक व्हायलाही मला आवडत नाही. म्हणूनच वर्कआऊट करणं मी टाळते. कारण १२ ते १५ तास शूट केल्यावर जिममध्ये जाण्यासाठी माझ्यात ताकद उरत नाही. पण मी डाएटवर पूर्ण लक्ष केंद्रित केलंय. माझ्या डाएटमध्ये सर्वात जास्त समावेश असतो तो पाण्याचा. मी पाणी, फळांचे रस भरपूर पिते. ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं अशी फळं मी खाते. जेवणामध्ये पालेभाज्या, चपात्या याचा समावेश असतो. भात मी खातच नाही. पण मांसाहारी जेवण मला खूप आवडतं. आठवड्यातून दोनदा तरी मी मांसाहारी पदार्थ खाते.

- तेजश्री प्रधान

योग आणि नृत्य

मी ग्लॅमरच्या दुनियेत काम करते. इथे सुंदर आणि आकर्षक दिसण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. माझं टार्गेट आहे झिरो फिगर बनवणं. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. जिममधल्या वर्कआऊटपेक्षा मी योगाला जास्त पसंती देते. कारण योग फक्त शरीरालाच नव्हे तर मनालाही शांती देतो. मी सहसा योग करणं चुकवत नाही. पडद्यावर आपल्याला फिट असलेलं पाहून कितीतरी लोक स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपण जर कुणाची प्रेरणा बनणार असू तर आपण स्वतःवर थोडी मेहनत घ्यायला काय हरकत आहे? योगसोबतच नृत्याची आवडही मला चांगल्या फिगरमध्ये राहण्यासाठी मदत करते. आरशासमोर उभी राहून मी मनसोक्त नाचते. त्यातच माझं वजन कमी होत असेल. डाएटचं म्हणाल तर गोड खायला आवडत असलं तरी ते मी टाळते.

- मानसी नाईक

फिटनेस माझं पॅशन

माझ्यासाठी फिटनेस हे एक पॅशन बनलं आहे. यामागे एक छोटीशी कहाणी आहे. एकदा का कार्यक्रमाला मी पुण्याला गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर तिथे खूप तेलकट, मसालेदार असं जेवण होतं. ते पाहून मी त्यांना सांगितलं, की अहो, असं जेवण मी जेवत नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मराठी कलाकार कुठे डाएट वगैरे करतात? तेव्हापासून मी ठरवलं, की आपलं क्षेत्र सुंदर दिसण्याशी निगडीत आहे तर का चांगलं दिसायचं नाही? मग मी फिटनेस आणि बॉडी बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर फिटनेस हे माझं पॅशन बनलं. आता एक दिवससुद्धा जिममध्ये जाणं चुकलं तर मला चुकल्याचुकल्यासारखं होतं. जिम इन्स्ट्रक्टरकडून मी मार्गदर्शन घेऊ लागलो. त्याने सांगितल्यानुसार आहारात बदल केले आणि अवघ्या तीन महिन्यांतच शरीरयष्टीला आकार येऊ लागला. आता मी लक्ष केंद्रित केलंय स्नायू बळकट करण्यावर.

- चिन्मय उदगीरकर

मी अभिनेता आहे किंवा ग्लॅमरच्या दुनियेत वावरतो म्हणून मला फिट राहणं गरजेचं आहे असं नाही. माझ्या मते प्रत्येक माणसाला फिट राहिलंच पाहिजे. मला 'डाएट'पेक्षा वर्कआऊटकडे जास्त लक्ष द्यायला आवडतं. आणि वर्कआऊट म्हणजे जिममध्ये जाऊन केलेला व्यायाम नव्हे तर फ्रीहँड व्यायाम म्हणा. मग ते पोहणं असेल किंवा आणखी कुठला खेळ. जिमच्या व्यायामातल्या एकसारखेपणामुळे नंतर-नंतर मला कंटाळा यायला लागतो. सध्या असलेलं सिक्स पॅक अॅब्जचं वेड मला कृत्रिम वाटतं. प्रत्येकाची शरीरयष्टी सिक्स पॅक अॅब्ज होऊ शकणार नाही. व्यायाम असा असावा की आपण नैसर्गिकरित्या फिट वाटू. मीही माझ्या शरीरावर मेहनत करतोय. पण सिक्स पॅकसाठी नाही. कारण मला अशी शरीरयष्टी हवी आहे जी मी पुढची वीस वर्ष टिकवू शकेन. डाएटचं म्हणाल तर मी खूप फुडी आहे. पण या क्षेत्रात काम करताना मला जिभेवर ताबा ठेवावा लागतो. म्हणून मी घरी बनवलेल्या जेवणालाच प्राधान्य देतो. दिवसातून सहा ते आठ वेळा मी खातो पण ते घरचंच.

- सुयश टिळक

एक तास स्वतःसाठी

माझ्या मते 'फिटनेस' ही आज गरज बनली आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नाही. मी जाड कधीही नव्हते. तरीही मलाही फिट आणि स्लिम राहायची गरज आहे हे जाणवलं आणि मी रोजचा वर्कआऊट सुरू केला. माझ्या मते कुणीही इतकं बिझी कधीच नसतं की आपण दिवसातला एक तासही स्वतःसाठी काढू शकत नाही. हाच विचार करत मी ठरवलं, की काहीही झालं तरी दिवसातला एक संपूर्ण तास माझ्या वर्कआऊटसाठी देणार म्हणजे देणारच. माझ्या नवीन 'स्लिम लूक' मागे व्यायामाचा महत्त्वाचा वाटा आहे. डाएटचं म्हणाल तर मी शाकाहारी आहे. मी नेहमी पौष्टीक आहार घेते. कामाच्या निमित्तानं मला अनेकदा मुंबईबाहेर जावं लागतं. अशावेळी व्यायाम होत नाही. पण मुंबईत असताना जर मला प्रमोशनसाठी सकाळी आठ वाजता निघायचं असेल तर पहाटे सहालासुद्धा मी जिममध्ये जाते. 'वजन कमी कर' असं मी कधीही कुणाला सांगणार नाही. पण फिट राहा असा सल्ला मात्र आवर्जून देईन.

- प्रिया बापट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊन जरा जास्तच आहे!

$
0
0

डॉ. संदीप केळकर, बालरोग तज्ज्ञ

कडक उन्हाळ्यामध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी कशाप्रकारे घेऊ?

- श्वेता जाधव

सूर्यप्रकाश शरीराला आवश्यक असला, तरी तापमानात बदल झाल्यामुळे विषाणूंचा संसर्ग, गॅस्ट्रो, टायफॉइड आणि कावीळ इ. आजार तसंच सुट्टीमध्ये तीव्र उन्हात तासनतास खेळल्यामुळे उष्माघात, डी-हायड्रेशन तसंच सनबर्न आणि शरीरातील क्षार कमी होणं आदी समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो.

सूर्यकिरणांचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून सहा महिन्यांखालील मुलांसाठी पातळ, तलम आणि पूर्ण बाह्यांचे कपडे, डोकं आणि मान झाकण्यासाठी टोपी घालावी. मुलांना शक्यतो सावलीतच खेळायला द्या. त्यांना सनस्क्रीन लोशन लावण्यास काहीच हरकत नाही. त्यातील सन प्रोटेक्शन फॅक्टर हा कमीत कमी १५ असावा. सहा महिन्यांवरील मुलांनाच हे लावावं. खास करून पोहण्याचा व्यायाम करणाऱ्या मुलांसाठी या लोशनचा वापर करणं योग्य ठरेल.

उष्णतेमुळे चिडचिड होणं, कशातंच मन न रमणं या गोष्टी मुलांमध्ये दिसून येतात. अशावेळी त्यांना भरपूर खेळायला द्या. खेळण्यातून होणारा व्यायाम उत्तम. मुलांना मुद्दाम उन्हात खेळायला देऊ नका; पण कायम घरातही बसवून ठेऊ नका. त्यांना उन्हाची सवयही झाली पाहिजे. या काळात मुलांनी भरपूर पाणी पिणं सगळ्यांत जास्त गरजेचं आहे. खाणं तर नीट हवंच; शिवाय पाणी आणि इतर पेयांचं सेवन जास्त प्रमाणात केलं पाहिजे. मुलं एक तासाहून जास्त वेळ मैदानात असतील, तर त्यांना वेळोवेळी शक्तीवर्धक पेय किंवा पाणी देत जा. सुट्टीच्या काळात मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणं टाळाच. पाणीही उकळून द्या.

मुलांना शक्यतो फिक्या रंगाचे, सुती, मऊ आणि हलके कपडे घाला. या कपड्यांमध्ये घाम व्यवस्थित शोषला जायला हवा. काही मुलांमध्ये घाम येण्याचं प्रमाण जास्त असल्यानं फंगल इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. अशावेळी ‌त्यांना‌ दिवसातून दोनवेळा अंघोळ करणं, बाहेरून आल्यावर भरपूर पाण्यानं हात-पाय स्वच्छ धुणं, खास करून जिथं घाम येतो असा भाग स्वच्छ आणि सुका ठेवण्याची समज दिली गेली पाहिजे.

उष्णतेमुळे डोकेदुखी, उलटी होणं, शारीरिक थकवा जाणवणं, चक्कर येणं अशी लक्षणं दिसल्यास उष्माघाताची लक्षणं असू शकतात. त्यासाठी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायामासाठी काढा वेळ

$
0
0

>> नमिता जैन, ‌- क्लिनिकल एक्सरसाइज,

लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

'सकाळी लवकर घर सोडतो आम्ही. दिवसभर ऑफिसातच जातो. मग संध्याकाळी थकायला होतं. व्यायाम करायचा तरी कधी? व्यायामाला वेळच नाही.' अशी तक्रार सर्रास सगळे करतात. पण दोस्तांनो, व्यायामासाठी वेळ काढायलाच हवा. त्यात हयगय करून चालणार नाही.

व्यायाम करायचा म्हणजे भल्या पहाटे उठून जिममध्ये घाम गाळून यायचा, असं नव्हे. अगदी हसत खेळत, चालता बोलताही व्यायाम करता येऊ शकतो. त्यामुळे व्यस्त वेळापत्रकामुळे व्यायामाला वेळ नाही, हे कारण कुणी देऊच नये.

झोपेतून उठण्यासाठी जसा आपण मोबाइलवर गजर लावतो, त्याप्रमाणे दर तीन तासांनी बसल्या जागेवरून उठण्यासाठी डोक्यात एक अलार्म फिट करून ठेवा. अगदी जागच्या जागी केलेली पायांची हालचाल, एकाच जागी केलेलं जॉगिंग, हातांचा हलकासा व्यायाम अशा साध्या उपायांनीही तुम्हाला ताजंतवानं झाल्यासारखं वाटेल. दररोज किती चाल होते याकडे बारीक लक्ष ठेवा. पेडोमिटरचा वापर करून तुम्ही किती चाललात याचा हिशोब ठेऊ शकता. रोज १०००० पावलं चालायचं ध्येय निश्चित करा. रोज तुम्हाला भरपूर फोन येत असतील तर एका जागी बसून न बोलता चालत चालत बोलायची सवय करून घ्या. एखाद्या नव्या पद्धतीने व्यायाम करण्याच्या पद्धती शोधून काढा. तुम्ही काय केल्याने उत्साही राहू शकता याचा शोध घ्या. त्यामुळे तुमचा सगळा ताण निघून जाईल आणि तुमच्यात अधिक उर्जा निर्माण होईल.

>>व्यायामाचे सोपे मार्ग

प्रवासातला व्यायाम

संपूर्ण शरीर आकसून घेऊन पाच सेकंद त्याच अवस्थेत राहा आणि पुन्हा पाच सेकंद स्थिर स्थितीत या. हा व्यायाम ३ ते ५ वेळा केल्यास रक्ताभिसरणाला मदत होते.

डोळ्यांचा व्यायाम

डोळ्यांच्या व्यायामाने डोळ्यांवरचा ताण निघून जातो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी खाली काही पद्धती दिल्या आहेत.

तळहातांचा वापर

तळहात एकमेकांवर घासून त्यातून ऊर्जा निर्माण करा. काहीसे कोमट झालेले हात डोळ्यांवर ठेवा. एक मिनिटासाठी हात डोळ्यावर तसेच राहू द्या. दिवसातून जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा हा व्यायाम करा.

कोल्ड फ्रेशनेस

डोळे बंद करून त्यावर १५ वेळा थंड पाणी मारा. ते सावकाशपणे पुसा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळून शांत वाटेल.

स्नायूंसाठी व्यायाम

बसल्याजागी पोट आत घेऊन दीर्घ श्वास घेऊन व्यायाम करता येईल. याने स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत होते.

विटामिन डी

सकाळच्या सूर्यप्रकाशात १५ ते २० मिनिटं चालल्याने ड जीवनसत्वाची कमतरता भासणार नाही.

ताणाशी सामना

तुम्ही ताणाला सामोरे जाता का? शांतपणे दीर्घ श्वास घ्या. शांत आणि हळुवारपणे घेतलेल्या श्वासामुळे हृदय आणि फुफ्फुसांना फायदा होतो. खाली दिलेले श्वसनाचे व्यायाम करून बघा.

दीर्घ श्वास

हळुवारपणे डोळे बंद करून श्वास घ्या. या शांत स्थितीत श्वास घेऊन हळुवार पद्धतीने सगळा ताण बाहेर घालवा.

डोळे बंद करा

डोळे बंद करून तुम्हाला असलेला ताण लक्षात घ्या आणि श्वास रोखून धरा आणि सोडा. पुन्हा काहीवेळाने हीच कृती करा.

तोंडाने श्वास सोडा

नाकाने श्वास घेऊन तोंडाने तो सोडायचा, हा व्यायाम फायद्याचा ठरतो. फुंकर मारताना ज्या पद्धतीने ओठांची स्थिती असते त्याच स्थितीत सावकाशीने श्वास सोडायला शिका.

- शब्दांकन - आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा पिकतो...

$
0
0

>> आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ

उन्हाळा कितीही कडक आणि सोसवणारा नसला, तरी एका गोष्टीसाठी मात्र तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो... ती गोष्ट म्हणजे, आंबा. द्राक्षं, कलिंगड, रानमेवा अशी खास उन्हाळी फळं बाजारात येऊन स्थिरावल्यानंतर आगमन होतं ते आंब्याचं. हापूसपासून तोतापुरीपर्यंत पिवळाधम्मक ते केशरी अशा रंगछटांमध्ये येणारा आंबा प्रत्येकाला भुरळ घालतो. आंबा कितीही आवडत असला, तरी डाएट करणारे मात्र त्याच्याकडे पाठ फिरवतात. खरंतर मनातून आंबा खावासा वाटला तरी डाएटमुळे गप्पा असतात. एकीकडे वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या राजेशाही फळाचा आस्वाद घ्यायचा असतो आणि दुसरीकडे आंब्यावर ताव मारल्यामुळे वाढणाऱ्या वजनाची चिंता सतावत असते. या काळात वजन वाढलं, की आंब्यालाच दोष दिला जातो. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांकडून आंबा खावा, की नाही हा प्रश्न हमखास विचारला जातो.

आंबा नक्कीच खावा. हे एक उत्तम फळ आहे. फक्त आंबाच नव्हे, तर कुठल्याही एका पदार्थाने वजन वाढत नसतं, तर तुम्ही तो कसा खाता यावर अवलंबून असतं. साखर घातलेल्या आमरसाच्या वाट्या पोळीबरोबर रिचवल्या, साखर घालून नंतर गाळलेल्या थंड रसाचे ग्लासवर ग्लास प्यायले, तर वजन वाढणारच; कारण साखरेमुळे कॅलरीमध्ये भर पडत असते. मग, आंबा कसा खावा?

आंबा एक अतिशय रसाळ, चविष्ट आणि पोषणतत्त्वांनी युक्त असं फळ आहे. यात असलेल्या क, अ आणि ब जीवनसत्त्वांच्या खजिन्यामुळे रोगप्रतिकार शक्ती तर वाढतेच; शिवाय त्यात असलेल्या भरपूर अँटीऑक्सिडंट्समुळे पोट, स्तन, मुत्राशय यांचा कॅन्सर रोखला जातो. यातले भरपूर तंतूमय पदार्थ (प्रो-बायोटिक फायबर) वजन कमी करण्यास मदत करतात. म्हणून आंबा जरूर खा; पण खाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

आंबा शक्यतो दिवसाच खा. त्यामुळे चयापचय क्रियेत वाढ होईल. व्यायामापूर्वी खा म्हणजे त्यादरम्यान उत्तम आणि त्वरित ऊर्जेचा स्त्रोत म्हणून आंबा काम करेल.

व्यायामानंतर खालावलेली ऊर्जेची पातळी पटकन भरून काढण्यास मदत होईल.

दोन खाण्यांच्यामध्ये फळ म्हणून एक वाटीभर फोडी खा.

इतर फळांच्या वा भाज्यांच्या सॅलेडमध्ये फोडी घातल्यास छान चव येते आणि शरीरात अल्कलाइन पातळी वाढते.

कडधान्याच्या कोणत्याही पदार्थांबरोबर खाल्ल्यास उत्तम स्नॅक होऊ शकतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबा खाताना सरल कर्बोदकं (जसं गोडाचे इतर पदार्थ, मैदा, मैद्याचे पदार्थ, पांढरा तांदूळ इ.) शक्यतो खाऊ नका.

आंब्यातील पोषणमूल्यं

(सर्वसाधारणपणे दररोज/प्रति व्यक्ती पोषकतत्त्वाच्या प्रमाणाच्या प्रतिशत प्रमाण) प्रत्येक १ कप फोडी वा १ छोटा आंबा (१६० ग्राम) उष्मांक - १०० कॅलरी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारीक व्हायचंय मला!

$
0
0

>>मुंबई टाइम्स टीम
वजन कमी करायचं म्हणजे सरसकट खाण्यावर बंदी आणायची, असं नव्हे. आपण काय आणि किती प्रमाणात खातोय, हे महत्त्वाचं आहे.
आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ खायचा थांबवणं प्रत्येकासाठीच अवघड असतं. अगदी वजन कमी करण्याची कितीही इच्छा असली तरीही. विशिष्ट वजनाचं ध्येय पूर्ण करेपर्यंत आवडत्या खाऊचा विरह एकवेळ सोसलाही जातो, मात्र त्यानंतर त्यावर ताव मारण्याची इच्छा आणखी तीव्र होत जाते. अशावेळेस कामी येतं, ते पोर्शन कंट्रोल. म्हणजेच आपण काय खातोय याबरोबरच ते किती खातोय याकडे नीट लक्ष देणं.

वजन कमी करायचं असलं, तरी चौरस आहार आणि त्यातील पदार्थांचं प्रमाणही नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. प्रत्येक दिवशी आपण जे खातो त्याचं आकारमान म्हणजेच वजन आणि त्यातून वेळोवेळी मिळणारी ऊर्जा आणि पोषकतत्त्वं यांचा शरीराच्या गरजेप्रमाणे घातलेला मेळ म्हणजे पदार्थाच्या प्रमाणावर ठेवलेलं नियंत्रण. ही ऊर्जा आणि पोषकतत्त्वं शरीराला इंधन पुरवतात, मात्र त्यांचं अतीप्रमाण शरीरात चरबीच्या रूपानं साठून राहातं. म्हणूनच योग्य प्रमाणात खायची सवय लावून घेणं महत्त्वाचं आहे. थोडं नियोजन, शिस्त आणि मनाचा निग्रह यातून पदार्थाच्या प्रमाणावर नियंत्रण आणता येईल. पुढील काही गोष्टींची सवय लावली, तर पदार्थ आणि प्रमाण याचा ताळमेळ लावणं सोपं जाईल.

>तुम्हाला दिलेल्या आहाराप्रमाणे दिवसभरातील प्रत्येक खाणं आणि त्यातील पदार्थ याची तयारी करून ठेवा. उदा. दिवसभराच्या पोळ्यांची कणीक : १ वाटी पीठ, १ पोळीसाठी याप्रमाणे घरातल्या सगळ्यांचे पीठ घ्या म्हणजे नेमक्याच पोळ्या होतील आणि प्रमाणात खाल्ल्या जातील.

>दिवसभरातील तेल, साखर, मीठ बाजूला काढा आणि तेवढंच वापरा. उदा. प्रत्येक व्यक्तीसाठी तीन चमचे तेल या हिशोबानं योग्यच प्रमाण घेतलं जाईल.

>एकाचवेळी खूप खाऊ नका. खाणं २-३ तासांच्या अंतरात विभागून घ्या. म्हणजे ठराविक अंतरानं शरीरास ऊर्जा आणि पोषण मिळत राहिल. उदा. रोजच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवायचं असेल, तर एकदम दोन अंडी आणि एक ग्लास दूध घेण्यापेक्षा नाश्त्यामध्ये एक आणि संध्याकाळच्या खाण्यात एक असं विभागून खा. एक ग्लास दुधाचं दही किंवा ताक करून ते विभागून दोन जेवणांमधे घ्या. म्हणजे जेवणातल्या प्रथिनांचं प्रमाणही वाढेल आणि पचनक्रियेवर ताणही येणार नाही.

>खाण्याची वेळ टाळू नका म्हणजे पुढच्या खाण्यापर्यंत खा-खा टाळली जाईल आणि योग्य प्रमाणातच खाल्लं जाईल.

>पदार्थाच्या चवीपेक्षा पोषणमूल्यास महत्त्व द्या. उदा. ब्रेड, बिस्किटं, टोस्ट हे पदार्थ खायला आवडतात; पण नुसत्या चवीला चांगले लागतात म्हणून मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा कणीक किंवा मिश्र धान्यानं बनलेले असे पदार्थ खा, त्यामुळे पोषणमूल्यांबरोबर चवही मिळेल.

>तुमच्या मनाबरेबरच पोटाचंही ऐका. पोट भरलं, की खाणं थांबवा. भुकेनुसारच पण योग्य खा. एखाद्या दिवशी एक पोळी + एक वाटी भात (पांढरा तांदूळ वापरण्याऐेवजी हातसडीचा तांदूळ वापरा किंवा भाज्या घातलेला पुलाव खा) असं विभागून खाल्ल्यानं मन आणि पोटही खूष होईल; शिवाय प्रमाणही बिघडणार नाही.

>अन्न व्यवस्थित चावून खा म्हणजे पोट भरल्याचा संदेश योग्यवेळी मेंदूपर्यंत पोहोचेल आणि प्रमाणातच खाल्लं जाईल.

> सर्वात महत्त्वाचं जे पदार्थ खायचे आहेत तेच आणि तेवढेच स्वयंपाकघरात ठेवा. या उपायामुळे अवांतर आणि नको असलेलं खाणं टाळलं जाईल. उदा. चॉकलेट, चिप्स, फरसाणसारख्या पदार्थांऐवजी सुकामेवा, फुटाणे, चिक्की, ऋतूनुसार मिळणारी फळं किंवा भाज्या यांचा योग्य तो साठा करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवेळी खाणार त्याला...

$
0
0

>>डॉ. अविनाश भोंडवे

आपण मुंबईकर चोवीस तास घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. पण आपल्या शरीरातल्या घड्याळाचं काय? त्याला वेळच्या वेळी अन्नपाणी दिलं नाही, तर ते घड्याळ बिघडण्याची शक्यता असते.

आपण जो काही व्यवसाय, धंदा, नोकरी करतो, ते पोटासाठीच. 'दोन वेळा पोट भरता येतंय ना?' म्हणजे व्यवसाय-धंदा ठीक चाललाय असं समजायचं असतं. पण आता मात्र या कामाच्या व्यापापायी आपल्या पोटाचेच हाल होऊ लागलेत. दोन वेळचं जेवण 'वेळेवर' खायलाही वेळ मिळत नाही!

व्यवसाय, धंदा किंवा नोकरीच्या सुरुवातीला यशाची वरची पायरी चढण्यासाठी आणि जीवघेण्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी दैनंदिन कामात वाहून घ्यावं लागतं. म्हणून तर यशाच्या पायऱ्या चढत जाताना, ‌अधिकाधिक यश मिळवण्यासाठी आणि यशस्वी झाल्यावर ते टिकवण्यासाठी घाम गाळून काम करावंच लागतं. या साऱ्या धबडग्यात जेवणाच्या वेळा विसरल्या जातात. या सगळ्याची सुरुवात होते, ती शाळा कॉलेजच्या काळातच. अभ्यास, शाळा, ट्युशन्स, तोंडावर आलेल्या परीक्षा, टेस्ट, सबमिशन्स, प्रेझेंटेशन यांच्या वेळा सांभाळताना जेवणाच्या वेळा दुय्यम ठरू लागतात.

सकाळी फक्त चहा आणि कधीतरी त्याबरोबर एखादं बिस्किटं खाणं, दुपारी उशीरा आणि तेही कामातून वेळ मिळाला, तर कॅन्टिनमध्ये नाहीतर ऑफिसमध्येच मागवलेली वडा-सामोसा-डोसा अशी काहीतरी डिश, संध्याकाळी पुन्हा चहा किंवा असंच काही तरी अरबट चरबट खाणं आणि रात्री पोटाला तडस लागेपर्यंत जेवणं हा साधारणत: आपल्या आहाराचा तक्ता असतो. त्यात परत कामासाठी जागरण करावं लागलं किंवा पार्टी झाली, तर मध्यरात्री असंच काही तरी च्याऊ-म्याऊ खाणं ओघानं येतंच.

खाण्याच्या वेळा का सांभाळाव्यात?

सर्व थरातल्या कार्यरत व्यक्तींना प्रश्न पडतो, की महत्त्वाचं काय? समोरच्या कामाची डेडलाइन की खाण्याची वेळ? का सांभाळायच्या या खाण्याच्या वेळा? आधुनिक जीवशास्त्रीय आणि मानवी शरीरक्रियाशास्त्रातील प्रयोगातून याचं उत्तर मिळतं. त्याचं असं असतं, की हातावरल्या घड्याळाप्रमाणे आपल्या शरीरातही एक घड्याळ असतं, याला 'बायोलॉजिकल क्लॉक' म्हणतात. हे घड्याळ तुमच्या कामाच्या डेडलाइननुसार नव्हे, तर सूर्याच्या उदय आणि अस्तानुसार काम करतं. आपल्या शरीरातलं इन्सुलिन आणि विविध हार्मोन, सर्व इंद्रियातले पाचक रस, शरीरांतर्गत अनेक चयापचय क्रिया या जीवशास्त्रीय घड्याळानुसार काम करत राहतात. त्यांना उर्जा मिळण्यासाठी आणि त्यांचं कार्य सुरू राहण्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ठराविक वेळेस अन्नाचा, अन्न घटकांचा आणि पोषणमूल्यांचा पुरवठा व्हावा लागतो.

सकाळी न्याहारी, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा थोडं खाणं आणि रात्री अगदी कमी अन्न अशाप्रकारे खाल्ल्यास हा पुरवठा ठीकठाक पद्धतीनं होत राहतो. मात्र, आपण त्यावेळी अन्न घेतलं नाही, तर साहजिकच शरीरावर आणि आरोग्यावर जो हितकारक परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही. या वेळा उलटल्यावर अन्न घेतलं जातं तेव्हा या घड्याळाचा ताल आणि तोल बिघडू लागतो. याचाच परिणाम म्हणून अनेकविध विकार, व्याधी आणि आजार उद्‍भवू लागतात.

लाइफस्टाइल डिसीज

खाण्यापिण्याच्या बदलत्या आरोग्यशैलीमुळे घडणारे हे आजार 'लाइफस्टाइल डिसिजेस' म्हणून गणले जातात. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणं, सतत अॅसिडिटी होणं, पोटाचे अल्सर्स हे आजार अवेळी आणि चुकीच्या खाण्यामुळे होतात हे आता साऱ्यांनाच माहीत झालं आहे; परंतु बद्धकोष्ठता, मूळव्याध, पित्ताशयाला सूज येणं आणि त्यात पित्ताचे खडे होणं, यकृतातील चरबी वाढणं, लिव्हर सिऱ्होसिस होणं, हाडांचे-सांध्यांचे विकार होणं हे आजारही यामुळेच वाढीला लागतात, असं आता सिद्ध होऊ लागलं आहे.

तरुण मुलींमधील पी.सी.ओ.एस आणि वंध्यत्त्व यांच्यामागे हेही कारण आहे असं दृष्टोत्पत्तीस येऊ लागलं आहे. किशोरावस्थेत आणि तारुण्याच्या वयात मुलींना योग्य, पोषक अन्नघटक न मिळाल्यामुळेच त्यांच्या पोटी जन्माला येणा‍ऱ्या अपत्यामध्ये काही दोष येण्याची शक्यता वाढते. अतिशय कठीण बाळंतपणं, गर्भार अवस्थेत पहिल्या तीन महिन्यात गर्भपात होणं, अनियमित पाळी, पाळीचा त्रास, नवजात अर्भकांमध्ये जन्मजात दोष, शिशुंना, बालकांना होणारे रोग या सर्व आजारांच्या इतर अनेक कारणांसोबत या मुलींचं असं अवेळी आणि अयोग्य खाणं हेसुद्धा कारणीभूत ठरतं.

आपण दिवसा कार्यरत असताना ऊर्जा न मिळाल्यानं या लोकांना सुरुवातीला संध्याकाळी आणि नंतर सातत्यानं कमालीचा थकवा जाणवत राहतो. कामाचा ताण आणि अवेळी खाणं यांच्या संयोगानं 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' आकाराला येतो. जीवनशैली बदलली, तरी माणसाच्या शरीराची अंतर्गत कार्यशैली तीच आहे. कामाच्या ढिगाऱ्याखाली दबून जाऊन खाण्याच्या वेळा टाळल्यानं आपला तोटाच होतो. जे काम आपण करतो त्याची गुणवत्ता प्रकृतीप्रमाणे हळूहळू ढासळू लागते. त्यामुळे खाण्याच्या साऱ्या वेळा पाळून काम केल्यास कामाची प्रत तर सुधारेलच; शिवाय मिळणारं यश चाखायला तब्येतही ठणठणीत राहील. या वेळा न पाळता अवेळी खाणाऱ्याला देव हे लाइफस्टाइल आजारांचं बक्षीस देणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रेक के बाद

$
0
0

संकलन : दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर
उन्हाच्या तडाख्यामुळे अनेकदा सुट्टी मिळाली तरी बाहेर पडणं नकोसं होऊन जातं. मग आपण घरीच राहून आराम करतो. मोठ्या मुश्किलीने मिळालेला हा वेळ फक्त स्वतःला देणं, हे आपल्या फायद्याचं ठरतं. त्यामुळे शरीराला तर आराम मिळतोच पण मनही ताजंतवानं होतं.

इंटरनेट सर्फिंग

तुम्हाला जाणून घ्यायची आहे, अशी प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर आधीपासूनच उपलब्ध आहे. आता तर, ऑनलाइन शॉपिंगमुळे तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट तुमच्या हाताबोटाशी सहज मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला करायची असलेली शॉपिंग तुम्ही घरी आपल्या बिछान्यावर बसूनही करू शकता. हजारो वस्तू या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण साइट निवडताना काळजी घ्या.

झोपून रहा

सोबत असलेल्या सर्व ताणतणावांवर मात करण्याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे मस्त ताणून देणं. आठवडाभराची राहिलेली झोप तुम्ही या दिवशी पूर्ण करू शकता. अनेक जण उन्हाळ्याच्या दिवसांत घराबाहेर पडण्यापेक्षा दिवसभर घरी झोपून राहण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी ताकद मिळते.

थोडा टीव्ही पहा

आपल्यातले अनेक जण एरव्ही आपल्या दिनक्रमात इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे टीव्ही पाहण्याइतकाही वेळही नसतो. आयपीएलचा हा मोसम बघता हातात पॉपकॉर्न घेऊन क्रिकेटसामना बघायला कोणाला नाही आवडणार? जर क्रिकेट आवडत नसेल, तर इतर शेकडो चॅनल तुमची वाट पाहत आहेत. अनेकदा टीव्ही समोर बसून राहणं सुद्धा तुमच्या शरीराला आराम देणारं ठरू शकेल.

ध्यान करा

ध्यान करणं (मेडीटेशन करणं) ही प्रत्येकासाठी वेगळी गोष्ट असू शकते. काही जण त्यासाठी योगा करतात. काही जण स्पा घेतात तर काही जण फक्त शांतपणे पडून राहतात. पद्धत कोणतीही असो, मेडीटेशनमुळे तुमच्या मनातली चलबिचल कमी होईल. मन शांत होईल. शांत संगीत ऐका. ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल. श्वासाचा व्यायाम करणं हे शरीर आणि मनासाठी फायद्याचं ठरू शकतं.

घरातून बाहेर पडा

कधीतरी एकट्यानेच घरातून बाहेर पडा आणि जवळपासच्या एखाद्या ठिकाणाला भेट द्या. कधीकधी अनेकविध कारणांनी अगदी आपल्या घराजवळची एखादी खास जागा पाहणं राहून जाते. स्वतःला हवं ते करण्याची मोकळीक तुम्हाला मिळत असल्याने ही छोटी ट्रीप म्हणजे उत्तम पर्याय असू शकतो. मुंबई आणि जवळच्या परिसरात तुमच्यासाठी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसं बसायचं?

$
0
0

प्रज्ञा भोसले-तोरसकर

प्रत्येक मनुष्य जसा वेगवेगळा असतो त्याप्रमाणेच त्याच्या शरीराची ठेवणही वेगळी असते. आपल्या शरीराची ठेवण म्हणजेच पोश्चर कसं असावं, याबाबत...

तुमच्या शरीराची ठेवण प्रभावी असेल तर तुमचे व्यक्तिमत्वही प्रभावी ठरते. नुसते सडपातळ व सुंदर दिसणे महत्त्वाचे नसते तर तुमचे बोलणे, तुमचे बॉडी पोश्चरही खूप महत्त्वाचे असते. एखादी महिला बारीक आहे, सडपातळ आहे म्हणजे ती फिट आहे असे समजले जाते. बऱ्याच महिला 'स्लीम व फिट' असण्याचा चुकीचा अर्थ लावतात. आपण कोणत्याही वयाचे असाल पण आपण आपले रोजचे काम उत्स्फूर्तपणे व न थकता करीत असाल तर आपण फिट आहोत असे समजावे.

उदाहरणच घ्यायचं झालं तर, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्याविषयी बोलता येईल. आज या वयातही त्यांच्या नृत्याच्या हालचाली मनमोहक आणि उत्स्फूर्त आहेत. याचाच अर्थ त्या आजही फिट आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे सकस, चौरस आहार व नियमित व्यायाम. आपले बॉडी पोश्चर कसे सुधारावे त्याची ही माहिती पुढीलप्रमाणे:

आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा जमिनीशी बरोबर ९० अंशाचा कोन करावा. जास्त पुढे किंवा मागे झुकू नये. सरळ उभे राहावे. खांदे कानाच्या खाली सरळ रेषेत असू द्यावेत. श्वास न घेता पोट आत खेचा जे हनुवटीला समांतर रेषेत असेल. हे झालं तुमचं उभं राहण्याचं योग्य पोश्चर. सुरुवातीला तुम्हाला अवघडल्यासारखे होईल पण सवय झाली की व्यवस्थित उभे राहाल. सुरुवातीला स्नायूंवर ताण आल्यामुळे ते दुखतीलह‌ी पण सवय झाली की दुखणं बंद होऊन जाईल.

कुठेही बसतानाही तुमच्या पाठीचा कणा ताठ असणं आवश्यक आहे. शक्यतो पाठीला आधार असावा. खाली बसत असाल तर भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाही. खूप वेळ विनाआधाराचं बसणं चुकीचं आहे. अनेकांना पाठीत पोक काढून, पोट पुढे घेऊन किंवा खांदे पाडून उभं राहण्याची सवय असते. या सवयीमुळे तुम्हाला पाठीच्या, खांद्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे केल्याने तुमचे पाठदुखीसारखे आजारही दूर पळतील. तुमचे बॉडी पोश्चर सुधारल्यामुळे तुम्हालाही छान वाटेल, आत्मविश्वास वाढेल. तुमचं आरोग्य, बोलणे आणि शरीराची ठेवण यामुळे तुम्ही सुंदर आणि फिट दिसता. तेव्हा नियमित व्यायाम करा, निरोगी राहा आणि आपले बॉडी पोश्चर सुधारा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांचं खाणं !

$
0
0

नमिता जैन

क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

लहान मुलांमधलं स्थूलतेचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय. त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये वेळीच बदल केला नाही त्यांना स्थूलत्त्वाचा त्रास होऊ शकतो.

मुलांमध्ये अशी अतिस्थूलता निर्माण होण्याची काही कारणं आहेत.

अन्नाची सहज आणि सोपी उपलब्धता.

आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ खाणं.

फावल्या वेळात खात राहणं.

जास्त प्रमाणात खाणं.

सतत फास्ट फूड खावंसं वाटणं.

एका जागी बसून राहणं.

हे लक्षात घ्या

अन्नातून ग्रहण केल्या जाणाऱ्या कॅलरीज आणि हालचालींद्वारे जाळल्या जाणाऱ्या कॅलरीज यातल्या असंतुलनामुळे स्थूलता संभवते. कधीतरी खाल्लेल्या पिझ्झा, पेस्ट्री, बर्गर किंवा कोल्ड ड्रिंकला तुमच्या लठ्ठपणासाठी जबाबदार ठरवू नका.

पालकांनी मुलांच्या खाण्याच्या बाबतीत गरजेपेक्षा जास्त कडक होऊ नये. अशाने ती मुलं घाबरून जातात आणि संधी मिळाली की पालकांच्या नकळत फास्ट फूड खातात. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या आवडीप्रमाणे आणि आरोग्याला उपयुक्त असा आहार त्यांना ठरवून द्या.

हे करून बघा !

आपल्या स्वयंपाकघरात भरपूर फळं, भाज्या, संपूर्ण धान्ययुक्त पदार्थ आणि न साठलेल्या चरबीचे पदार्थ आहेत याची खात्री करून घ्या.

फास्ट फूड मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये जाणं टाळा.

नवनवीन पदार्थ घरीच करून बघा. मुलांच्या आवडत्या फास्ट फूडच्या कृतीत बदल करून ते हेल्दी बनवायचा प्रयत्न करा.

शक्य तिथे हलके पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. क्रीम पुडिंगच्या ऐवजी दुधावरची साय वापरा. संपूर्ण अंड खाण्यापेक्षा एग व्हाईट खा. फुल फॅट ऐवजी लो फॅट वापरा.

मुलांना घरच्या छोट्या कामांमध्ये सामील करून घ्या. जेणेकरून त्यांची शारीरिक हालचाल होईल. यात कार धुणं, कुत्र्याला अंघोळ घालणं अशी कामं मुलं एन्जॉय करतात. कुटुंबासाठी सायकलिंग किंवा स्विमिंगसारखा व्यायाम सुट्टीच्या दिवशी ठरवा.

मुलांशी खाण्याच्या बाबतीत मोकळेपणाने संवाद साधा. त्यांना रागावून किंवा धाकात ठेऊन जेवायला घालू नका. जंक फूड कधीतरी खायला चालत असलं तरी रोज खाऊ नये हे मुलांना समजावून सांगा. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्या. त्यासाठी पुस्तकांचे इंटरनेटवरील माहितीचे दाखले द्या.

मुलांना सतत प्रोत्साहित करत रहा. त्यांनी ठरवलेल्या खाण्याच्या सवयी मोडू नयेत म्हणून त्यांना वेळच्या वेळी शाबासकी द्या. अनेकदा मित्रांच्या सांगण्यावरून मुलांचं लक्ष विचलित होऊ शकतं. याची विशेष काळजी घ्या.

मुलांना जबाबदारीची कामं द्या. खरेदीच्या नियोजनात त्यांना सामील करून घ्या. कधीतरी तुमच्याबरोबर स्वयंपाकघरात त्यांना काम करु द्या. अशाने मुलं खाण्याच्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त करायला शिकतील आणि चांगल्या सवयी आपोआप आत्मसात करतील.

शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अति तिथे माती

$
0
0

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ

व्यायाम न करणं जसं वाईट तसंच अती व्यायाम करणंही वाईटच.

व्यायाम करणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात. एका प्रकारातले लोक अधून-मधून वेळ मिळेल तसा व्यायाम करतात. म्हणजे आज वेळ मिळाला म्हणून व्यायाम केला, नाहीतर नाही केला. त्यांना व्यायाम केल्याचा फार आनंदही नसतो आणि त्यात खंड पडला, तरी त्याचं दुःखही नसतं. दुसऱ्या प्रकारातील लोक असतात, ते रोज ठरवलेला वेळ व्यायामासाठी देतातच. व्यायामाचा वेळ हा त्यांच्या दिनक्रमाचाच एक भाग असतो. रोज ठरवलेला व्यायाम न चुकवता ते करत असतात.

तिसऱ्या प्रकारातील लोक व्यायामासाठी वेडे असतात. सकाळ- संध्याकाळ फक्त व्यायाम करताना दिसतात. या प्रकारातील लोक काही वेळा, कमी वेळेत मोठं ध्येय गाठायचं असतं म्हणून व्यायामाच्या मागे लागतात. बऱ्याच वेळा आधीची काही वर्षं निवांत घालवलेली असतात म्हणजे फक्त खाणं, पिणं, फिरणं, उशीरा झोपणं, उशीरा उठणं, असा काहीसा दिनक्रम असल्यामुळे कमी वेळेत भरपूर वजन वाढतं आणि अचानक त्यांच्या लक्षात येतं, की लवकरात- लवकर हे वजन कमी करणं गरजेचं आहे. मुख्यतः कॉलेजच्या मुलांमध्ये हा प्रकार दिसून येतो. दहावी-बारावीतील मुलांचीही तीच गत असते. वर्षभर क्लासेस, अभ्यास आणि सतत खाणं यामुळे वर्षभरातच त्यांच्या वजनात कमालीचा फरक पडतो आणि मग ते कमी करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असतं. ऑफिसमध्ये दिवसभर काम करणाऱ्यांचीही काहीशी अशीच स्थिती असते.

मी असे बरेच लोक पाहिलेले आहेत, जे फिटनेसचं ध्येय लवकरात लवकर गाठायच्या नादात सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास व्यायाम करतात. त्यांच्या व्यायामाची तीव्रताही गरजेपेक्षा जास्त असते. दोन वेळा व्यायाम करणं शक्य नसेल, तर आधी एक तास जिम, मग लगेच एखादा ग्रूप क्लास आणि त्यानंतरही स्वतःचे काही इंटरनेटवर पाहिलेले व्यायाम प्रकार करणारे लोक मला माहीत आहेत. आहारातही हे लोक गरजेपेक्षा जास्त काटछाट करतात. फक्त फळं, सूप्स, सलाडवर रहातात. वेळ कमी आणि ध्येय मोठं या नादात व्यायाम आणि क्रॅश डायटचा अतिरेक होताना दिसतो. या सगळ्याचा आपल्या शरीरावर काय विपरित परिणाम होऊ शकतो ते आपण बघूयात...

शरीराची अतिरिक्त झीज होते.

अकाली प्रौढत्त्व येतं.

चेहरा ओढल्यासारखा आणि निस्तेज दिसतो.

सांधे झिजतात.

अशक्तपणा जाणवतो.

रात्रभर झोप होऊनही सकाळी उठल्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येते.

शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे सतत आजारी पडण्याची शक्यता वाढते.

दिवसभर निरुत्साही वाटतं.

दिवसेंदिवस परफॉर्मन्स कमी होत जातो.

हार्ट रेट गरजेपेक्षा जास्त वाढतो त्यामुळे हृदयावर ताण येतो.

स्नायू दुखावल्यासारखे, सुजल्यासारखे होतात.

शारीरिक थकव्याबरोबर मानसिक ताणालाही सामोरं जावं लागतं.

मानसिक ताणामुळे झोपेवर परिणाम होतो, अकारण चिडचिड होऊ शकते, उदासीनता वाढते.

वरील पैकी कोणतेही परिणाम आपण अनुभवत असाल, तर वेळीच सावध व्हा. जिम ट्रेनर बरोबर अथवा डॉक्टरांशी याबद्दल चर्चा करा आणि योग्य व्यायाम, आहाराला प्राधान्य देऊन नव्यानं सुरुवात करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘या’ तीन औषधांपासून सावध राहा!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

मधुमेहींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी!... अमेरिकेतून भारतात आलेली डायबिटीसवरची तीन औषधं तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानंच या औषधांबाबत योग्य खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

कॅनाग्लिफ्लोजिन, डॅपाग्लिफ्लोजिन आणि एम्पाग्लिफ्लोजिन ही तीन नवी औषधं 'टाइप-२'च्या मधुमेही रुग्णांसाठी तयार करण्यात आली आहेत. यातली दोन औषधं नुकतीच भारतात दाखल झाली आहेत. पण, या औषधांमुळे रक्तातील आम्लाचं प्रमाण लक्षणीय वाढत असल्यानं त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, याकडे अमेरिकेच्या एफडीएनं लक्ष वेधलं आहे.

रक्तातील साखर मुत्रावाटे बाहेर काढण्यासाठी ही औषधं किडनीला सक्रिय करतात. याउलट, अन्य औषधं पाचक ग्रंथींचा वापर करून 'टाइप-२' डायबिटीस नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे किडनीवर कुठलाही ताण पडत नाही. म्हणूनच नवी औषधं देताना आणि घेताना डॉक्टर आणि रुग्णांनी काळजी घ्यावी, असं एफडीएनं नमूद केलंय. यापैकी एखादं औषध घेतल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, पोटात दुखू लागलं किंवा उलटी वगैरे झाल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घसादुखी सामान्य नव्हे!

$
0
0

काही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे दुखतो, त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊया...

घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.

ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.

> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.

> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.

> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.

> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.

> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.

> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.

> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षणे

> सर्दी, सायनसमुळे

> तोंडाच्या कॅन्सरमुळे

> घसा कोरडा पडल्याने

> तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास

> अॅलर्जी, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास

> मोठ्याने बोलल्याची सवय असल्याने

> दारू पिणे, धूम्रपान, उष्ण ठिकाणी काम करणे

रोगनिदान

घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.

> कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.

> घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळ्याचील रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.

> कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र पेशंटला तज्ज्ञाकडे पाठवणेच योग्य ठरेल.

>घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.

प्राथमिक उपचार

> गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ इतक्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.

> लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी अधूनमधून तोंडात ठेवावी.

> जंतूदोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखा समतोल व्यायाम आणि खाण्याचा

$
0
0



आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ

योग्य आहाराबरोबरच योग्य व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते, हे आता बहुतांश लोकांना पटलेलं आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप, तीव्रता, शारीरिक क्षमता आणि वेळेनुसार आहार जसा वेगळा त्याचप्रमाणे व्यायाम आणि त्याचा परिणामही तसाच वेगळा असतो.

व्यायामाचे चांगले रिझल्ट मिळण्यासाठी तुम्ही व्यायामापूर्वी आणि नंतर काय खाता हे तितकंच महत्त्वाचं. व्यायाम करण्यासाठी शरीराला योग्य पोषण आणि ऊर्जा मिळाली नाही, तर स्नायू, मांसपेशी कमकुवत होतात, पर्यायानं शरीरसुद्धा कमकुवत होतं. मग, व्यायाम करताना अथवा दिवसभरातच थकवा येणं, चक्कर येणं, पायात पेटके येणं, दम लागणं असे त्रास होऊ शकतात.

कधी खावं?

व्यायामाच्या वेळेनुसार खाणं असावं.

व्यायामाची वेळ सकाळी लवकर असेल, तर रिकाम्या पोटी व्यायाम करू नये. नाश्ता किंवा पूर्ण जेवण घेतल्यानंतर किमान २-३ तासानंतर व्यायाम करावा. स्नॅक्ससारख्या छोट्या खाण्यानंतर एका तासानं व्यायाम करावा. पचण्यास जड आणि अति-स्निग्ध पदार्थ व्यायामापूर्वी टाळावेत.

व्यायामानंतर साधारण ३०-४५ मिनिटांच्या आतच खावं.पाणीसुद्धा योग्य प्रमाणात व्यायामाआधी, दरम्यान आणि नंतर प्यावं; कारण हायड्रेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

काय खावं?

व्यायाम करताना सातत्यानं आणि बराचवेळ टिकणारी ऊर्जा लागते. अशी ऊर्जा शरीरास जटिल कर्बोदकं आणि प्रथिनं यांपासून बनलेल्या पदार्थांनी मिळते. उदा. मिश्र पीठं (धान्य + डाळी/धान्य + कडधान्य + भाज्या) यांचं थालिपीठ/पराठे/धिरडी खावीत, ओटस् किंवा दलिया + मोड आलेली कडधान्यं यांचा उपमा.

यामुळे व्यायामादरम्यान शरीरास हळूहळू; पण योग्य प्रमाणात प्रथिनं आणि शर्करा मिळते. अशा खाण्यानंतर २-३ तासांनी व्यायाम करावा. सुका मेवा + लाह्या किंवा ओट्सची खीर असे पदार्थ खाऊन साधारण एका तासानं व्यायाम करावा.- व्यायाम करत असताना घाम येऊन शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात आणि पटकन थकवा येतो. हे टाळण्यासाठी व्यायाम करताना पाणी, फळांचा ज्यूस, सरबत थोडं-थोडं घ्यावं.

व्यायामामुळे स्नायूंची झालेली झीज, खालावलेली ऊर्जेची पातळी भरून काढण्यासाठी आणि शरीरातील वाढलेला ताण कमी करण्यासाठी पटकन ऊर्जा आणि प्रथिनं देणारे पदार्थ खावेत. अंड्याचे पदार्थ, दूध+फळं, उकडलेले किंवा भाजलेले शेंगदाणे + गूळ इ.- व्यायामाचा उद्देश ठरवून म्हणजेच वजन कमी करणं, वाढवणं वा शरीरयष्टी कमावणं तसंच वय, वजन आणि लिंग यानुसार व्यायामाचा योग्य परिणाम साधायचा असेल, तर व्यायामाच्या वेळेनुसार योग्य आणि प्रमाणात खाल्लं पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑफिस योगा

$
0
0





योगासनं ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधी आणि कुठेही करू शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराची लवचिकता आणि उत्पादन क्षमता वाढवता येऊ शकते. शरीराला आराम मिळून स्नायू शिथिल होतात. योगासनं म्हणजे काहीतरी फार अवघड व्यायामप्रकारे नव्हे. श्वसनाचं तंत्र, विविध आसनं आणि ध्यान या तिन्हीच्या संगमाने, मन आणि श्वास यांचा मेळ घालणं म्हणजे, योग होय. त्यामुळे कार्यक्षमता आणि सर्जनशीलताही वाढत असल्याने अनेक खासगी कंपन्यांनीही आपल्या ऑफिसेसमध्ये योगासनांसाठी खास जागा उपलब्ध करून दिली आहे.

चालणं, ताण देणं, वाकणं हे या सर्व कृती आपल्या रोजच्या दिनक्रमाचा भाग आहेत. जर तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करत असाल आणि या कृती तुमच्याकडून नियमितपणे होत नसतील तर ऑफिस योगा करणं फायद्याचं आहे. सतत बसून काम केल्याने पाठदुखी, डोकेदुखी, मानदुखी यासारख्या समस्या उदभवू शकतात. जर त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर आणि एकूण गुणवत्तेवर होऊ शकतो. सध्याचं ऑफिसमधलं व्यावसायिक आयुष्य हे खूप ताणाचं झालं आहे.

तुम्हाला एकाच जागी बसून काम करायचं असेल तर तुम्ही खुर्चीतल्या खुर्चीत काही व्यायामही करू शकता. ऑफिसातील ताणापासून लांब पळू नका. तर त्यावर उपाय शोधून काढा. ऑफिस योगामुळे ताण कमी होतो. स्नायूंतील मजबूतपणा आणि लवचिकता वाढते. वेदना कमी करा. स्वतःसाठी केवळ काही मिनिटांचा वेळ काढा आणि मग तुमच्याच आरोग्यात झालेला बदल पाहा. काही साध्या कसरती बसल्या जागी क्रमवार करता येतात. त्यासाठी दिवसातील कोणत्याही वेळेचं बंधन नाही. पण त्यासाठी आधी काही गोष्टी करणं, आवश्यक आहे. तुम्ही घट्ट मोजे आणि बूट घातले असतील. तर आधी ते काढून ठेवा. कमरेचा पट्टा किंवा टायही काढून ठेवा. पेहरावात मोकळेपणा असेल तर व्यायाम करणं सोईचं जातं. यासाठी फक्त २०-२५ मिनीटांचा कालावधी लागेल.

> डोळे बंद करा. मान खाली करा. उजवा कान, उजव्या खांद्याजवळ नेत डोकं मागच्या बाजूला न्या. हळू हळू मान वळवत डावा कान, डाव्या खांद्याजवळ येईल अशा पद्धतीने मान डाव्या बाजूला न्या. अशा प्रकारे आता हळूहळू मान वर्तुळाकार कक्षेत फिरवण्यास सुरुवात करा. खांदे सैल सोडा. तीन ते चार वेळा मान अशा प्रकारे फिरवून या कृतीची दिशा बदला.

> पाय जमिनीला टेकवा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. श्वास वर ओढून घेताना पाठ मागच्या बाजूस घेत छताकडे पाहा. श्वास सोडताना आपली पाठ पुढच्या बाजूस घेत जमिनीकडे बघा. पुन्हा श्वास घेत ही कृती चार ते पाच वेळा करा.

> तुमची खुर्ची टेबलापासून थोडी दूर सारा. त्यावर बसून तुमचे पाय जमिनीवर पसरा. पाठ ताठ ठेऊन हात मागच्या बाजूला नेऊन बोटे एकमेकांत पकडा. आता याच स्थितीत कमरेतून पुढच्या बाजूस वाका. छाती मांडीवर टेकवा आणि मान सैल सोडवा.

> शरीराच्या पुढच्या बाजूस आणि जमिनीला समांतर अशा पद्धतीने हात ताणा. हाताचा तळवा (तळहात) छताच्या दिशेने ठेवत उजवा हात डाव्या हातावर ठेवा. (गरज वाटल्यास हाताचे कोपर थोडे वाकवा) दोन्ही तळहात एकत्र जुळवा. हाताचे कोपर वर घ्या. खांदे मागच्या बाजूस न्या. आता हीच कृती डाव्या हातावर उजवा हात ठेऊन पुन्हा करा.

> खुर्चीच्या एका बाजूला बसून पाय जमिनीवर सोडा. खुर्चीची पाठ दोन्ही हाताने पकडून तुमची छाती उजव्या बाजूने मागच्या बाजूस ट्विस्ट करा. आता हीच कृती खुर्चीच्या दुसऱ्या बाजूनेही करा. ही कृती आणखी काही वेळा करा.

> हाताचे कोपर डेस्कवर टेकवा. आता आपले हात कपाळाच्या दोन्ही बाजूस टेकवून एकदा घड्याळाच्या दिशेने तर एकदा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवा. थोडक्यात कपाळ आणि डोक्याचा भाग हाताने घासा. आता ही कृती आणखी दहा ते पंधरा वेळा दीर्घ श्वासासह करा.

संकलनः दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायपोसक्शन, की व्यायाम?

$
0
0

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ
व्यायाम आणि आहारामुळे मिळणारा रिझल्ट आणि लायापोसक्शनमुळे मिळणारा रिझल्ट सारखाच आहे का? तर नक्कीच नाही.

दिवसेंदिवस आपल्याकडे अतिस्थूल लोकांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. त्याला वयाचंही काही बंधन राहिलेलं नाही, म्हणजे अगदी शाळेतल्या मुलांपासून पन्नाशीच्या व्यक्तींमध्ये स्थूलत्व दिसून येतं. अवेळी जेवण, हॉटेलमध्ये खाण्याचं वाढतं प्रमाण, पाश्चात्य खाद्यसंस्कृती, व्यायामासाठी न मिळणारा वेळ, वाढता मानसिक तणाव ही त्याची कारणंही सर्वज्ञात आहेत.

आता समाजाच्या विशिष्ट वर्गात राहायचं असेल, पार्टीला जायचं असेल, वेस्टर्न आउटफिट्स घालायचे असतील, तर शेपमध्ये आणि अप टू डेट राहणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. मात्र, जर व्यायामासाठी वेळ काढता येत नसेल, तर कसं यायचं शेपमध्ये? तर व्यायामाशिवाय इतरही असंख्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. चरबी कमी करण्यासाठी मार्केटमध्ये गोळ्या, पावडर (काही वेळा त्यांना 'आयुर्वेदिक' असंही संबोधलं जातं), काही नवीन मशीन्सही उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शरीरावरील तुम्हाला हव्या त्या भागावरील चरबी कमी करू शकता. काही ठिकाणी औषध व मशिन्स या दोन्हीचा समावेश पद्धतीत केला जातो. या झाल्या कोणत्याही ऑपरेशन शिवाय वापरल्या जाणाऱ्या पद्धती. या व्यतिरिक्त लायापोसक्शन ही सर्जिकल पद्धतही आपल्या सर्वांना माहीत असेल. लायपोसक्शन म्हणजे काय, तर एका उपकरणाद्वारे आपल्या शरीरातील हव्या त्या भागातील चरबी बाहेर काढली जाते. पूर्वी सिनेतारका किंवा मॉडेल्स या प्रकारची सर्जरी करून घेत असत; पण अलीकडे उच्च वर्गाबरोबरच उच्च मध्यम वर्गातही या पद्धतीनं चरबी कमी करण्याचा पर्याय म्हणून बघितलं जात आहे आणि त्याचा वापरही होताना दिसत आहे. तुम्हाला काही महिन्यांच्या किंवा वर्षांच्या व्यायामानंतर जो परिणाम दिसतो तोच परिणाम काही तासांच्या या सर्जरी नंतर दिसून येतो. या पद्धतीला लोक प्राधान्य देतात.

कारणं स्पष्ट आहेतः लगेच रिझल्ट मिळतो कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट पडत नाहीत व्यायामासाठी रोज वेळ द्यायची गरज नाही घाम गाळायची गरज नाही आहारामध्ये कोणत्याही प्रकारची बंधनं पाळण्याची गरज नाही.

मग व्यायाम आणि आहारामुळे मिळणारा रिझल्ट आणि लायापोसक्शनमुळे मिळणारा रिझल्ट सारखाच आहे का? तर नक्कीच नाही. लायापोसक्शनमुळे आपल्या शरीरातील फक्त अतिरिक्त चरबीचं प्रमाण कमी होऊन शेपमध्ये दिसण्यास मदत होते, तर व्यायामानं या बरोबरच, शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं आपल्या स्नायूंची ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो उत्साह वाढतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते सकारात्मकता वाढते

योग्य पद्धतीनं आहार व व्यायाम केल्यास तोटा काहीच नाही; पण लायापोसक्शनचे तोटे किंवा साइड इफेक्ट्सही आहेत, उदा. सर्जरी जरी काही तासांची असली, तरी त्या नंतरची वेदना काही महिन्यांपर्यंत राहते हा अत्यंत खर्चिक प्रकार आहे एकदा ही सर्जरी केली, की आता परत आयुष्यात कधीच चरबीचं प्रमाण वाढणार नाही असं होत नाही. त्यानंतर तुम्ही योग्य व्यायाम व आहार घेतला नाहीत, तर परत अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढणारच आहे व्यायामामुळे मिळणारे अन्य कोणतेही फायदे या सर्जरीमुळे मिळत नाहीत

सर्वांना पटकन रिझल्ट्स हवे असतात, मग क्षेत्र कोणतंही असो; पण अशा इन्सटंट रिझल्ट्समागचे फायदे तोटे जाणून घेतल्यावरच पाऊल उचलणं जास्त शहाणपणाचं ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहा आरोग्यदायी

$
0
0

आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ

वातावरणातली उष्णता सध्या वाढली आहे. अशा वेळी खाणं, कपडे या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं तर सुट्टीचे राहिलेले दिवस आनंददायी करता येतील. त्यासाठी नेमकं काय कराल?

उन्हाळ्याची सुट्टी संपत आली असली तरी मुलांचं खेळणं अजूनही संपलेलं नाही. दिवसाचा ख्ूप वेळ खेळ, दंगामस्ती, इकडं- तिकडं भटकणं, वेगवेगळा खाऊ खाणं, उन्हातून आल्यावर घटाघटा पाणी किंवा सरबत पिणं, आंब्यावर मनसोक्त ताव मारणं असाच दिनक्रम सुरू आहे. सध्या वातावरणात उष्णता इतकी वाढली आहे की या दंगामस्तीच्या नादात त्यांच्या खाण्या-पिण्याकडेही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मुलांना खेळायला जाण्यापासून रोखता येत नाही आणि त्यांचा आवडता खाऊ खाण्यापासूनही थांबवता येत नाही. शिवाय आता शाळाही लवकरच सुरू होणार आहे.

कडक उन्हाळ्यामुळे वातावरण रूक्ष आणि उष्ण बनलेलं आहे. लहानांवर त्यांचा जास्त परिणाम होतो. शोष पडणं, भूक मंदावणं, उन्हाळे लागणं, घामामुळे त्वचासंसर्ग होणं, घामोळे, फोड येणं, पित्त वाढणं आणि अगदी वाईट म्हणजे उष्माघाताचा त्रास होणं अशा एक ना अनेक तक्रारी सुरू होतात. मग, हे त्रास रोखण्यासाठी, किमान तो कमी करण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा.

पाणी

सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा येणं, चक्कर येणं असा त्रास होऊ शकतो म्हणून पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या.

खेळताना मुलांना पाण्याची बाटली बरोबर द्या आणि दर २०-२५ मिनिटांनी थोडं-थोडं पाणी प्यायला सांगा म्हणजे एकदम शोष पडून घटाघटा पाणी प्यायलं जाणार नाही.

दिवसभरात असं किमान ८-१० ग्लास पाणी द्या.

पाण्यात तुळशीची पानं, सबजा बी घाला. यामुळे रूक्षता आणि उष्णता कमी होईल.

उकाड्यामुळे फ्रीजमधलं पाणी जास्त प्यालं जातं; पण त्यामुळे रक्तवाहिन्या आणि स्नायू आकुंचन पावतात. हे शरीरास हानीकारक ठरू शकतं.

पाण्याला पर्याय म्हणून सरबताचे तयार पॅक, ज्यूस, एरिएटेड पेयं, वेगवेगळ्या पावडरीपासून बनणारी पेय देऊ नयेत; कारण ही पेयं डायुरेटिक (लघवीचं प्रमाण वाढवणारे पदार्थ) सारखं काम करतात. त्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षार याचं प्रमाण कमी होतं. त्याऐवजी पन्हं, घरी बनवलेली सरबतं, शहाळं, फळांचे रस, शहाळं, ज्यूस, कॉकटेल, ताक, लस्सी ही पेयं द्या.

कपडे

मुलांना सुती, मलमल आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. ज्यानं घाम टिपला जाईल आणि त्वचेला जंतुसंसर्ग होणार नाही.

घराबाहेर जाताना किंवा संध्याकाळी अंगभर कपडे घाला म्हणजे कडक उन्हामुळे त्वचा रापणं, सनबर्न तसंच डास, कीटक चावणं यांपासून संरक्षण होईल.



दैनंदिन आहार

पोळी भाजीऐवजी चटपटीत आणि सटरफटर खाणंच मुलांकडून खाल्लं जातं. त्यामुळे योग्य पोषण जरा दुर्लक्षितच होतं. असं टाळण्यासाठी...

खूप मसालेदार आणि तेलकट पदार्थ न देता चटपटीत पण पचण्यास हलके पदार्थ द्या. उदा. वाफवलेल्या मुगाचे चाट, हिरवे मूग आणि भाज्या याचं कटलेट, पॅटिस, मुगाचं सारण असणारे पराठे, घरी केलेली पाणीपुरी, कैरी घालून भडंग, साळीच्या लाह्या इ.

चयापचय कमी असल्यामुळे पचण्यास हलका आहार द्यावा. जसे तांदूळ+ मूग खिचडी, तांदळाचं घावन (गोड /तिखट), भाकरी, पोळी पिझ्झा (भाज्या घालून) इ.

याशिवाय नाचणी, ज्वारी आणि ओट्स वापरही वेगवेगळ्या पदार्थात करा. उदा. ओटची खीर, नाचणी खीर, उकड इ. यामुळे शरीरातील उष्णता व रूक्षपणा कमी होईल.

मधलं खाणं म्हणून या हवामानात मिळणारी फळ जसं कलिंगड, खरबूज, फणस किंवा फळांचं सॅलड, दही + फळाचा गर घालून केलेलं योगर्ट, लस्सी इ. देऊ शकता.

चविष्ट आणि अँटिऑक्सिडंटयुक्त खाण्यानं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानमेवा जरूर द्या. जसं जांभळं, करवंद, आमसुलं इ.

घरचं आणि ताजच अन्न खायला द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यरात्रीचे बकासूर

$
0
0

डॉ. अविनाश भोंडवे

आजच्या वेगवान जीवनशैलीत प्रगतीचा वारू चौखूर दौडवताना ठेचा या लागणारच; पण त्याचा परिणाम म्हणून आपली आरोग्यशैली बिघडू देणं बरोबर नव्हे. त्याऐवजी वाइट सवयींच्या बकासूराला चीतपट करून उत्तम आरोग्याची कास धरणं योग्य ठरेल. काय वाटतं तुम्हाला?

संगणक युगातील बदलेल्या जीवनशैलीत, खाण्यापिण्याबाबतीत एक नवी सवय उदयाला आली आहे. रात्री उशीरापर्यंत टेलिव्हिजन बघणे किंवा कम्प्युटरवर काम करणं आणि मध्यरात्री किंवा उत्तररात्री अचानक खावखाव सुटणं. मग काय फ्रीज उघडायचा, त्यात जे शिल्लक असेल त्या अन्नावर, नाहीतर त्यात ठेवेलेली चॉकलेट्स, कँडिज, पॅकबंद ज्यूस, चीज, मिठाई; नाहीतर कपाटातले चिप्स, पेढे अशा गोष्टींवर आडवा हात मारायचा. रात्रीचं पोटभर जेवण झालेलं असूनही या लोकांमधला बकासूर मध्यरात्री अचानक जागा होतो आणि जे समोर असेल त्याचा फडशा पाडला जातो. पाहता पाहता ही सवय एखाद्या व्यसनासारखी शरीराचा आणि मनाचा ताबा घेतं.

का होतं असं? वरवर पाहता जिभेवर आणि खाण्यावर ताबा नसणं हे याचं कारण वाटलं, तरी रोजच्या धकाधकीच्या रुटीनमधला कामाचा तणाव, धावपळ, डोक्यावर सतत टांगून ठेवलेल्या कमिटमेंटस्, असाइनमेंट्स, डेडलाइन्स याचा तो संकलित परिणाम असतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या एक प्रकारे सौम्य मानसिक निराशेचाच तो प्रकार असतो. दिवसभरातल्या वेगवान आयुष्यात, थोडंदेखील रिलॅक्स होता न आल्यानं रात्री विमनस्क अवस्थेत काहीतरी बघत राहणं, टीव्हीची चॅनेल्स बदलत, नाहीतर वेबसाइटवर सर्फिंग करत वेळ काढला जातो. यानं झोप येत नाही; पण मन थोडसं विसावतं आणि मग जीभ बंड करून उठते. काही तरी खावंसं वाटतं आणि मग त्याला कुठलाही निर्बंध राहत नाही. हा सगळा मामला पोटात गेल्यावर बकासूराला खूप उशीरा उत्तररात्री शांत झोप येते.

एका पाहणीनुसार तणावपूर्ण वातावरणात काम करणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय व्यक्ती, डॉक्टर-वकिलांसारखे व्यावसायिक, बिझनेसमन, सामाजिक-राजकीय कार्य करणारे, लेखन, नाट्य अशा कलांशी संबंधित व्यक्ती; शारीरिक श्रम नसलेल्या म्हणजेच बैठं काम करणाऱ्या व्यक्ती यात जास्त संख्येनं असतात. वयाचा विचार केला, तर ३५ ते ५५ वयाचे म्हणजे मध्यमवयीन स्त्री-पुरुष यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. नियमितपणे व्यायाम करणारे, खेळाडू, अॅथलिट्स यात फारच कमी आहेत. या पाहणीत सुमारे ४,००० लोकांचा समावेश होता. यातल्या ४० टक्के व्यक्तींना मधुमेह, ६० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि जवळजवळ ८० टक्के लोकांमध्ये स्थूलत्व तसंच अॅसिडिटीचे त्रास आढळून आले.

आपल्या शरीरातील चयापचयक्रिया आणि हार्मोन्स यांचं चक्र घड्याळाच्या काट्यानुसार असतं. रात्री आपल्या शरीराची झीज भरून काढण्याचं कार्य होत असतं. त्यामुळे रात्री अशा भरभक्कम, अतिरिक्त खाण्यानं रक्तातील साखरेच्या आणि चरबीच्या पातळीमध्ये वाढ होते. हे सारं वजनवाढीला कारणीभूत होतं. या स्थूलपणाचा परिणाम म्हणून मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे 'लाइफस्टाइल' विकार उद्भवणं ओघानं आलं.

याशिवाय रात्री असं पोटभर खाल्लं, की पोटातील पाचक रस आणि विशेषतः अॅसिड जास्त स्त्रवतं. मग खाऊन लगेच आडवं झाल्यानं, हे अॅसिड उसळ्या मारत अन्ननलिकेत प्रवेश करतं आणि छातीत जळजळण्याचा त्रास सुरू होतो. रात्रीच्या या खाण्यानंतर दात घासणं हमखास विसरलं जातं. त्याचा दातांवर, हिरड्यांवर परिणाम होऊन दात किडणं, हिरड्या सुजणं, तोंड येणं असे विकार झाल्यास नवल ते कसलं.

मध्यरात्री जाग्या होणाऱ्या या बकासूराला जेरबंद करायचं असेल, तर प्रथम पोट रिकामं ठेवून कामं करत राहू नये. खाण्याच्या नैसर्गिक वेळा पाळाव्यात आणि दोन खाण्यामधलं अंतर तीन तासांपेक्षा कमी नसावं. शिवाय जिभेवर ताबा हवा. घरातल्या फ्रीजमध्ये रात्री खाव्याशा वाटणाऱ्या गोष्टी साठवून ठेवू नये. काही तरी खाण्याची तीव्र इच्छा झालीच तर काकड्या, संत्री, मोसंबी, केळी अशा गोष्टी फारतर खाव्यात. रात्री झोपताना कपभर दूध घेतल्यास, बऱ्याच जणांच्या पोटातला हा असूर शांत राहू शकतो.

खरं पाहिला गेलं, तर हा आजच्या जगण्यात निर्माण होणाऱ्या एका अनामिक पोकळीचा म्हणजे न्यूनत्वाची भावना निर्माण होण्याचा हा भाग असतो. आपल्या जीवनात आपण मागं पडतोय, कुठंतरी काहीतरी कमी पडतंय, काही तरी चुकतंय अशा भावनेचा हा अविष्कार असतो. अशा लोकांना मानसिक निराशा कमी करण्याचे उपाय करावे लागतात.

समुपदेशन आणि काही औषधांचीसुद्धा गरज भासते.

आजच्या वेगवान जीवनशैलीत प्रगतीचा वारू चौखूर दौडवताना ठेचा लागणारच; पण त्याचा परिणाम म्हणून आपली आरोग्यशैली बिघडवून, मनाचं स्थैर्य आणि शरीराचं स्वास्थ्य पणाला लावणं अयोग्य ठरेल. त्याऐवजी अशा सवयींच्या बकासूराला चीतपट करून आरोग्याची कास धरणं समयोचित ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हसत रहा-निरोगी रहा’

$
0
0

डॉ. सर्वेषा भोंडवे-महाजन

प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असतात. त्यात हसरा चेहरा आणि आत्मविश्वासानं बोलणं अतिशय महत्‍त्वाचं आहे. या दोन्हींचा सरळ संबंध आहे तो तुमच्या स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित दंत रचनेशी.

बत्तीस दातांच्या संरचनेत प्रत्येक दाताचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. प्रत्येकाचा आकार वेगळा आणि कामही वेगळं आहे. 'खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' असा टोमणा जरी आपण सहजतेनं मारत असलो तरी शास्त्रानुसार थोड्याफार प्रमाणात हे सत्य आहे. समोरच्या दातांवर आपलं दिसणं, हसणं आणि उच्चार अवलंबून असतात तर मागचे दात मुख्यत्वेकरून चर्वणासाठी उपयोगी ठरतात.

आपण बत्तीस दातांच्या या संचाचे वरचे दोन आणि खालचे दोन असे चार भाग पाडले तर प्रत्येक भागात दोन पटाशीचे दात, एक सुळा, दोन उपदाढा आणि तीन दाढा असतात. तिसऱ्या दाढीला 'अक्कल दाढ' म्हटलं जातं. साधारण १८ वर्षादरम्यान व त्यानंतर ही दाढ येत असल्याने असे नामकरण झाले असावे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आता अक्कलदाढा न येता तोंडात एकूण २८ दातांचा संच दिसून येतो. प्राचीन काळच्या कवट्यांमध्ये तीन ऐवजी चार वा पाच दाढा म्हणजेच ३६ वा त्यापेक्षा जास्त दातही आढळून आले आहेत. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांपासून दात येणं सुरू होतं. त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते एकूण २० दात असतात. ६ ते ८ वर्षांपासून दुधाचे एक-एक दात पडून त्याजागी पक्के दात येऊ लागतात.

आता सहज मनात येणारा प्रश्न म्हणजे असे दातांचे दोन प्रकार, दोन संच असण्याचं कारण काय? उत्तर अगदी सरळ आहे. वयानुसार लहानपणी चेहरा अगदी छोटा असतो. हळूहळू चेहऱ्याचा आकार मोठा होत जातो. खाण्याच्या गरजा आणि प्रकारही वाढत जातात. त्यानुसार आकाराने मोठ्या आणि अधिक मजबूत दातांची गरज असते. साधारण ८ ते १० व्या वर्षी काही दुधाचे तर काही पक्के असे मिश्र स्वरुपाचे दात असतात. चेहऱ्याच्या तुलनेने ते मोठेही असतात. त्यामुळे दंत वैद्यक शास्‍त्रात या काळाला 'अग्ली डकलिंग स्टेज' संबोधण्यात येते. याबद्दल माहिती नसल्यास बरेच पालक संभ्रमित होण्याची शक्यता असते. नैसर्गिकपणे दातांचे दोन संच असण्याचं कारण मी मात्र गंमतीने देते की, एकदा केलेल्या चुका दुरुस्तीसाठी तुम्हाला दुसरी संधी बहाल करण्यात येते. कृपया ती दवडू नका आणि दातांची योग्य निगा राखा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 2765 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>