Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

खात रहा,आनंदी रहा

$
0
0

पुणे टाइम्स टीम

कॉलेजमध्ये असताना तरुण मंडळी उगाचंच मी जाड होत आहे/ होतो आहे असं म्हणत रडत बसतात आणि अन्नावर नियंत्रण ठेवतात. उलट तरुणवयातच जिभेचे चोचले पुरवायला हवेत आणि शरीराच्या वाढीसाठी लागणारे पोषक पदार्थ खायला हवेत. फिट राहण्याच्या नादात ही मंडळी अन्नासोबतचं नातं नकारात्मक करतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. आश्चर्य वाटलं ना वाचून? पण हे खरं आहे. खाद्यपदार्थांसोबत आपलं एक नातं तयार झालेलं असतं. ते खाण्याच्या प्रमाणाबाबत आणि पद्धतीबाबत
संतुलन ठेवता आलं, की मन आणि शरीर दोन्ही सुदृढ राहतं. फूडसोबत घट्ट नातं कसं निर्माण करायचं याच्या काही टिप्स...

१. संकोच नको
कुठलीही आवडीची डिश ऑर्डर करताना आणि खाताना मनात संकोच ठेऊ नका. हे खाल्ल्यानं माझ्या इतक्या-इतक्या कॅलरी वाढतील. मी जाड होईन, असे विचार मनात आणू नका. संकोच करून खाल्लं, तर मन तृप्त होत नाही आणि त्या पदार्थाचा नीट आनंदही घेता येत नाही. त्यामुळे खाताना मनसोक्तपणे खा.

२. खाण्याचा आनंद घ्या
शांतपणे एका जागी बसून तुम्ही तो पदार्थ खाल्ला, तर तो अंगी लागतो, प्रत्येक घास नीट चावत खाल्ला, तर शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्त्वं नीट मिळतात, शिवाय प्रत्येक घासाचा आनंद घेतल्याचा आनंदही मिळतो. त्यामुळे कुठलाही पदार्थ अजिबात घाई न करता शांतपणे एकाजागी बसून खा.

३. अन्नाची नासाडी नको
या जगात अनेक लोकांना खायला मिळत नाही, ते लक्षात ठेऊनच अन्न खा. ताटामध्ये जे काही आहे, त्याचा आनंदाने आस्वाद घ्या. अन्न वाया न घालवता संपूर्ण संपवा. तुम्ही जे खाताय त्याचा तुमच्या मेंदू आणि शरीराच्या वाढीला खूप उपयोग होत असतो, हे कधी विसरू नका.

४. मनमुरादपणे खा
खाताना ‘मी हे खाल्लं, तर माझी जाडी वाढेल’, ‘मी हे खाल्लं, तर मला आजारच होईल,’ असले नकारात्मक विचार मनात ठेऊ नका, त्यानं तुमच्या मनावर परिणाम होतो आणि ताण निर्माण होतो. त्यामुळे जे काही खायचं आहे, ते आधीच नीट विचार करून निवडा आणि मगच ऑर्डर द्या.

५.परफेक्ट असं काही नसतं
कुणीच परफेक्ट अन्न खात नाही. तेलकट पदार्थ कधीतरी खाल्ले, तरी काहीही हरकत नसते, शेवटी तुमचं मन आनंदी राहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या खाण्यावर अति नियंत्रण ठेऊ नका; पण अति तेलकट खाणंही घातक ठरू शकतं, त्यामुळे खाण्याकडे लक्ष असू द्या.

६. नखरे नकोत
बाहेरगावी गेल्यावर जे उपलब्ध आहे, त्यातलाच पदार्थ निवडून खा, विनाकारण मला हे चालत नाही, ते आवडत नाही असे नखरे करू नका. यामुळे तुमचं अन्नासोबतचं नातं बिघडू शकतं आणि हट्टामुळे ताणही येऊ शकतो. हवं तसं, आवडतं आणि ज्याचा आपण आनंद घेऊन शकतो, असं अन्न मिळालं नाही, तर चिडचिड होऊ शकते.

७. अवेळी खाणं नको
सुट्टीमध्ये काहीही काम नसताना उगाच भूक नसेल, तरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी खाल्लं, तर मात्र जाडी वाढते. त्यामुळे भूक नसेल, तर उगाच खाणं टाळा. लक्ष विचलित करण्यासाठी चक्कर मारायला जाणं, टीव्ही बघणं, पुस्तक वाचणं मित्रांसोबत गप्प्पा मारणं यामध्ये मन रमवा.

८. शरीरावर प्रेम करा
तुम्ही दिवसभर खूप शारीरिक आणि मानसिक कष्ट करता. अशा वेळेस योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. त्यामध्ये काहीही कमी पडता काम नये, कारण शरीराची, पोषणतत्त्वांची जेवढी झीज होत आहे तेवढ्या प्रमाणात पोषक अन्न खाणं आवश्यक आहे. तुमच्या शरीरावर प्रेम करा. त्याच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक सत्त्वं खा आणि सुदृढ, आनंदी जीवन जगा.

संकलन : साक्षी जोशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>