Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

वाढत्या वजनाची गोष्ट

$
0
0

पुणे टाइम्स टीम

शहरी लोकांचं जीवन हे त्यांची जीवनशैली, तंत्रज्ञानाचा वाढता सहभाग आणि घरपोच मिळणाऱ्या सुविधा यांसारख्या अनेक सुखसोयींनी समृद्ध झालं आहे; पण नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली अशा शहरांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे लठ्ठपणामुळे चिंताग्रस्त असल्याचं आढळून आलंय. या सर्वेक्षणाद्वारे लठ्ठपणाची विविध कारणंही समोर आली आहेत. अवेळी आहार, मानसिक तणाव, मधुमेह, हृदयाचे विकार हे वजनवाढीस कारणीभूत ठरत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ६० टक्के इतकं आहे. आज घरात सगळं सहजरित्या उपलब्ध होत असल्यामुळे आजची पिढी आळशी होत चालली आहे, हेही वजनवाढीचं मोठं कारण असतं, असं तज्ज्ञ सांगतात.

लठ्ठपणाची कारणं आणि प्रमाण

◆अवेळी जेवण- ३३ टक्के

◆मानसिक तणाव- ३० टक्के

◆हृदयविकार- २१.६ टक्के

वजन कमी करण्यासाठी...

- आहार नेमकाच असावा आणि प्रत्येक घास हा सावकाश चावून खा, जेणेकरून रक्तातील साखरेचं प्रमाण आणि भूक दोन्ही नियंत्रणात राहतात.

- तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळा.

- महागड्या व्यायामशाळेत जाण्यापेक्षा नियमित तीस मिनिटं जलद चालण्याचा व्यायाम केलात तरीही हृदय निरोगी राहतं.

- लठ्ठपणा दूर करण्यासाठी असलेली अनेक घातक औषधं, गोळ्या घेऊ नयेत. त्याचे दुष्परिणाम लगेच जाणवतात. तसंच, त्यामुळे अधिक वजन वाढण्याचीही शक्यता असते.

- लठ्ठ आहोत म्हणून स्वतःला कमी लेखण्याची गरज नाही. त्यामुळे मानसिक ताण वाढतो आणि नकळतपणे हा तणाव वजनवाढीस कारणीभूत ठरतो.

- वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार यांचा फायदा होत नसल्यास बेरिएट्रिक शस्त्रक्रियेचा आधार घेता येऊ शकतो, कारण ही एक वैद्यकीय प्रमाणभूत शस्त्रक्रिया आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles